बीएचआर घोटाळ्यात मातब्बरांना अटक

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आता सात जणांना अटक करण्यात आली असून यात जळगाव व जामनेरसह इतर ठिकाणच्या मातब्बरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृृत्त असे की, बीएचआर सहकारी पतपेढीचा अवसायक याला हाताशी धरून मालमत्तांच्या खरेदीत कोट्यवधींचा गैरव्यवहार करण्यात आल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. यात ठेविदारांच्या पावत्या कमी मूल्यात मॅच करण्याचा गोरखधंदा देखील समाविष्ट होता. या प्रकरणात व्यावसायिक सुनील झंवर हा प्रमुख संशयित असून यासोबत अवसायक जितेंद्र कंडारे, सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, सूरज झंवर आदींसह इतरांना देखील आरोपी करण्यात आले आहेत. या प्रकरणात अलीकडेच सूरज झंवर याला काही अटी शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला होता. तसेच सुनील झंवर याने पुण्याच्या न्यायालयात हजर राहून आपले वॉरंट रद्द करून घेतले होते. तर कंडारे याला मात्र फरार घोषीत करण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणात अजून काही जणांची नावे रडारवर होती. या अनुषंगाने आज पहाटे जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर येथील छगन झालटे व जितेंद्र पाटील, भुसावळ येथील आसीफ तेली, पाळधी येथील जयश्री मणियार आणि संजय तोतला व अजून एकाला अटक केली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Protected Content