जळगाव विमानतळाला तांत्रिक व आर्थिक सहाय्यता मिळावी; खा. स्मिता वाघ यांची मागणी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगांव विमानतळ हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे विमानतळ असून सद्यस्थितीत विमानतळाचे कार्य फक्त एकाच पाळीत सुरू असून विमानतळाचे कार्य दोन पाळीत सुरू करण्यासाठी तांत्रिक तसेच आर्थिक मदतीची गरज असून तातडीने तांत्रिक व आर्थिक सहाय्यता केंद्र सरकार कडून मिळावी अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी लोकसभेत नियम ३७७ अन्वये केली.

जळगांव विमानतळावरून सद्यस्थितीत देशांतर्गत प्रवाशी वाहतूक सुरू असून भविष्यात अंजिठा येथील जगप्रसिद्ध लेण्यातील पर्यटक वाढीसाठी विमानतळाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच विमानतळावर हवाई प्रक्षिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात येते,परंतु विमानतळावर तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एकाच पाळीत विमानतळाचे कार्य सुरू असते.विमानतळावर इतर भौतिक सुविधा नसल्यामुळे प्रवाश्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी केंद्र शासनाने तातडीने जळगांव विमानतळाला तांत्रिक व आर्थिक सहाय्यता तातडीने उपलब्ध करण्यात अशी मागणी खा.स्मिता वाघ यांच्या कडून लोकसभेत करण्यात आली.

याबाबत खा.स्मिता वाघ यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री श्री. किंजारापू राममोहन नायडू यांची भेट घेवून तातडीने जळगांव येथील विमानतळाला तांत्रिक व आर्थिक सहाय्यता देण्याची मागणी केली. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकर यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री यांच्याकडून देण्यात आले. खा.स्मिता वाघ यांच्या मागणीमुळे लवकर विमानतळावर सुविधा उपलब्ध होतील व जिल्ह्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील हवाई वाहतुकीला बळ मिळणार आहे.

Protected Content