जागतिक नेमबाजीत भारताला पाच सुवर्ण तर दोन रौप्य पदके

rio

रिओ दी जानेरो वृत्तसंस्था । रिओत नुकताच झालेल्या जागतिक नेमबाजीत भारताने ५ सुवर्ण, प्रत्येकी २ रौप्य व ब्राँझपदकांसह अव्वलस्थान मिळवले आहे. यामुळे पुढील वर्षी होणा-या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांकडून अपेक्षा बऱ्याच उंचावल्या आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्डकप नेमबाजीत भारताने ५ सुवर्ण आणि प्रत्येकी २ रौप्य व ब्राँझपदकांसह अव्वलस्थान मिळविल्यामुळे भारतीय नेमबाजांवरचा विश्वास आता आणखी वाढला आहे. या वर्षीच्या चार वर्ल्डकपमध्ये भारताने एकूण २२ पदकांची कमाई केली आहे. त्यातच १० मीटर एअर रायफल नेमबाजी महिला गटाच्या जागतिक क्रमवारीत भारताच्या अपूर्वी चंडेला, अंजुम मुदगिल आणि वलरिव्हन एलावेलिन यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविल्यामुळे एकूणच भारताने नेमबाजीत जागतिक स्तरावर पहिले स्थान मिळविले आहे. भारताचे युवा नेमबाज मनू भाकेर आणि सौरभ चौधरी यांनी आयएसएसएफ वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र गटात सुवर्णयश पटकावले. याच प्रकारात भारताच्या यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माने रौप्यपदकाची कमाई केली. तसेच मनू-सौरभ जोडीने वर्ल्डकपमधील एअर पिस्तुलमध्ये चारही सुवर्णपदके आपल्या नावे केले आहेत.

Protected Content