आयकर विभागाने काँग्रेसचे बँक खाते गोठवले; पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा‍ | निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्या. देशातील प्रत्येक राजकीय पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागला आहे. अशातच काँग्रेसने आज २१ मार्च रोजी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते. आयकर विभागाने तिन्ही नेत्याचे बँक खाती गोठवली आहे. या विरोधात काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. भारताला अख्ख्या जगात लोकशाही, मुल्ये आणि आदर्शासाठी ओळखले जाते. कोणत्याही लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणूका होणे गरजेचे आहे. सर्वांना समान संधी मिळायला हवी परंतू आमच्या पक्षांची खाती गोठविल्याने आमच्यावर अन्याय होत असल्याचे खरगे यांनी सांगितले.

भाजपने स्वत:साठी हजारो कोटी जमा केले आणि आमची खाती गोठवून टाकले असा आरोप अध्यक्ष खरगे यांनी केला. खरगे यांच्या मुद्द्यालाच पकडत सोनिया गांधी यांनी हा मुद्दा केवळ कॉंग्रेससाठीच नव्हे तर संपूर्ण लोकशाहीसाठीच धोकादायक आहे. जनतेने आम्हाला दिलेला पैसा आमच्या लुटला जात आहे. हे लोकशाहीला धरुन नसल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.

यावेळी काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन सुध्दा उपस्थित होते त्यांनी सांगितले की, आर्थिक वर्षे 2017-18 साठी एक नोटीसीसाठी चार बॅंकातील आमच्या 11 बॅंक खात्यातील 210 कोटी रुपयांच्या निधीवर अंकुश बसविला गेला. 199 कोटी रुपयांच्या एकूण निधीतील केवळ 14.49 लाख रोकड ( आमच्या खासदारांनी पक्षाला दान केलेला निधी ) सापडली होती. ही रोख रक्कम एकूण दानापैकी केवळ 0.07 टक्के आहे. आणि शिक्षा 106 टक्के रकमेला आहे. बॅंक खाती दर गोठवली तर आम्ही निवडणूक कशी लढवायची. तुमची जर खाती बंद केली, एटीएम बंद केले तर तुम्ही जगणार कसे. ना आम्ही प्रचार करू शकत. ना प्रवास करू शकत. ना नेत्यांना खर्चासाठी पैसे देऊ शकत अशी व्यथा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. निवडणूकीच्या दोन महिने आधी अशी कारवाई करणे म्हणजे ते कॉंग्रेसला निवडणूक लढवू देऊ इच्छित नाहीत. हा कॉंग्रेस सोबतचा अन्याय आहे. या निवडणूक आयोग देखील गप्प आहे. आम्हाला 20 टक्के जनता मतदान करते. परंतू सर्व संविधानिक यंत्रणा या अन्यायावर शांत बसल्याचे राहूल गांधी यांनी सांगितले.

Protected Content