लव्ह जिहादमध्ये हिंदू मुलींची लावली जाते बोली- साक्षी महाराजांचा दावा

फिरोजाबाद । लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींची बोली लावली जाते, असे विधान उत्तर प्रदेशमधील उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

आज फिरोजाबाद येथील एका कार्यक्रमात खासदार साक्षी महाराज हणाले, लव्ह हा एक चांगला शब्द आहे. लव्ह प्रेम विवाहाची परंपरा सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हापासून सुरू आहे. यात कोणालाही आक्षेप नाही. मात्र, ज्यावेळी जिहाद जोडला जातो, त्यावेळी ते विषबाधा होते. लव्ह जिहाद हिंदूच्या मुलींना खोटी नावे ठेवून फसवणूक केली जाते. त्यांच्याकडून दहशतवादी जन्माला घातला जातो आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले जाते. साक्षी महाराज पुढे म्हणाले की, लव्ह जिहादचे पैसे परदेशातून येतात. जिथे कट्टर हिंदूच्या मुलींची किंमत ११ लाख रुपये आहे. ब्राह्मण ठाकूर आणि ओबीसी मुलींच्या वेगवेगळ्या किंमती निश्‍चित आहेत. तसेच, मदरसे व मशिदीमधून हे चालविले जाते, असा दावा साक्षी महाराज यांनी केला आहे. याशिवाय, योगी सरकारने आणलेल्या लव्ह जिहाद कायद्याचे त्यांनी कौतुक केले आहे.

Protected Content