श्रीधरनगर येथील विवाहितेचा हुंड्याच्या पैशांसाठी छळ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । श्रीधरनगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा लग्नानंतर हुंड्याच्या पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणांविरूद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की,  श्रीधरनगर येथील माहेर असलेल्या राजेश्वरी अमित माळी यांचा जऴगावातीलच विठ्ठलपेठ येथ अमित अरुण माळी यांच्यासोबत विवाह झाला. लग्नानंतर हुंड्याच्या पैशांसाठी पतीसह सासू व सासरच्या इतर मंडळींनी राजेश्वरी हिचा शिवीगाळ व चापटा बुक्क्यांनी मारहाण करत  मानसिक व शारीरिक छळ केला. हा छळ असह्य झाल्याने राजेश्वरी माहेरी निघून आल्या व याबाबत बुधवारी १६ मार्च रोजी रामानंदनगर पाेलिसात तक्रार दिली.

या तक्रारीवरून राजेश्वरी हिचे पती अमित अरुण माळी,  सासू मंजू अरूण माळी, चुलत सासू जयश्री बालमुकुंद माळी,  चुलत सासरे बालमुकुंद महारू माळी  सर्व रा. विठ्ठल पेठ, जळगाव व नणंद प्रतिभा भवरलाल गुजर, व भवरलाल गुजर दोन्ही रा. पनवेल, मुंबई या सहा जणांविरूद्ध  गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सुनील पाटील हे करीत आहेत

 

Protected Content