Home Cities गिरीश महाजन यांनी विकासावर बोलावे- रवींद्र पाटील (व्हिडीओ)

गिरीश महाजन यांनी विकासावर बोलावे- रवींद्र पाटील (व्हिडीओ)

0
108

जळगाव प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कुठेही लढावे, हा त्यांचा वैयक्तीक प्रश्‍न आहे…मात्र त्यांनी आम्हाला आव्हान देण्याआधी विकासावर बोलावे असे प्रति-आव्हान आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी दिले. ते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 13 फेब्रुवारी रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी रवींद्रभैय्या पाटील यांना गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना दिलेल्या आव्हानाबाबत विचारणा केली. याप्रसंगी ते म्हणाले की, गिरीश महाजन यांनी आधी विकासावर बोलणे अपेक्षित आहे. आज त्यांच्याच जिल्हा परिषद अध्यक्षा महिला आयोगात धाव घेतात याचा अर्थ काय ? याशिवाय, समांतर रस्ते, पाणी समस्या, रस्ते समस्या आदींसह अनेक समस्या आ वासून उभ्या असतांना महाजन यांना फक्त विकासाबाबत चर्चा करावी. गिरीश महाजन यांनी कुठेही लढावे, हा त्यांचा वैयक्तीक प्रश्‍न आहे…मात्र त्यांनी आम्हाला आव्हान देण्याआधी विकासावर बोलावे असे प्रति-आव्हान रवींद्र पाटील यांनी दिले.

पहा :- रवींद्र भैय्या पाटील नेमके काय म्हणालेत ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound