भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू; धावत्या कारवर कोसळला ट्रक

अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी गावाजवळ रविवारी रात्री झालेल्या अपघातात चार जणांना दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धावत्या कारवर ट्रक कोसळल्यानं हा अपघात झाला आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमींना शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

नाशिकच्या दिशेने निघालेल्या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करत असताना अचानक हा ट्रक त्या कारवर कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कंपनीच्या इटीयोस कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं मदत कार्य सुरू केलं. त्यामुळं एका महिलेचा जीव वाचला. मात्र, एका दोन वर्षीय चिमुकल्या मुलीसह चार जणांचा या अपघातात बळी गेला. या अपघातात ओजस्वी धारणकर (वय-२), आशा सुनील धारणकर (वय-४२), सुनील धारणकर (वय-६५) व अभय सुरेश विसाळ (वय-४८) या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीनं वाचविण्यात यश आलंय. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Protected Content