अन्वय नाईकांना आत्महत्येस भाग पाडले : संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप नेत्यांमुळे अन्वय नाईक यांच्यासारख्या मराठी उद्योजकाला आत्महत्या करावी लागल्याचा गंभीर आरोप आज खासदार संजय राऊत यांनी केला असून यासोबत त्यांनी सोमय्या व त्यांचा पुत्र जेलमध्ये जाणार असल्याचा पुनरूच्चार केला.

भाजप नेते किरीट सोमय्या हे रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यांची पाहणी करण्यासाठी कोलई गावात जात असतांनाच खासदार संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी बोलतांना त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या कोर्लइ  गावात बंगले शोधायला गेले आहेत. जाऊ द्या. त्यांच्या पाठीपाठी जायला ते काय नेल्सन मंडेला आहेत का? ते काय क्रांतीकारक आहेत का? तो चोर आणि लफंगा आहे. या देशातील सर्वात मोठा चोर लफंगा आणि डाकू कोणी असेल तर तो हाच आहे. त्याच्या विरोधात खंडणीचे गुन्हेही दाखल होणार आहेत. त्याचा खेळ संपणार आहे. तुम्ही पाहत राहा. लवकरच हे बाप-बेटे तुरुंगात जाणार आहेत, असं सांगतानाच अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसही तेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

अन्वय नाईकसारखा एक मराठी माणूस, उद्योजक यांनी भाजपाच्या दबावामुळे आत्महत्या केली, कारण हे लोक अर्णब गोस्वामीला वाचवत होते. किरीट सोमय्यांनीदेखील अन्वय नाईक यांना अर्णब गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, बिल पाठवायचं नाही यासाठी धमकावल्याची माझ्याकडे माहिती आहे. दोन वेळा बोलावून त्यांना धमकावण्यात आलं. त्यानंतर ही आत्महत्या झाली आहे. भाजपाच्या लोकांनीच त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केली.

भाजपाचे लोक महाराष्ट्र आणि मुंईबतून मराठी उद्योजकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व अन्वय नाईकचे हत्यारे असून आणि त्यांच्यातील एक हत्यारा त्या जमिनीवर चालला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

Protected Content