टायगर ग्रुप जळगावतर्फे आज अन्नदान व वृक्षारोपनाचा कार्यक्रम

जळगाव, प्रतिनिधी । टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज टायगर ग्रुपचे गरीब व गरजूंना अन्नदान व वृक्षरोपांचा कार्यक्रम करण्यात आले.

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव व उत्तर महाराष्ट्रातील सागर कांबळे तसेच खान्देश ग्रुपचे अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा टायगर ग्रुप कडून गरीब व गरजू लोकांना अन्न दान करण्यात आले. मटण मार्केट भिल वस्ती शिरसोली रोड झोपड पट्टी तसेच वृक्षारोपण शाम नगर येते करण्यात आले. रक्तदान असे सामाजिक कार्यक्रम आयोजित केलेले होते. टायगर ग्रुप जळगाव जिल्ह्यातील प्रमुख सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी गौरव उमप, सागर सपके, सोपान मानकर, मनोज बाविस्कर, आनंद घुगे, जितू निंबाडकर, सागर गायकवाड, राकेश मराठे, सागर पारधी, साई उमप, सागर सपकाळे, विवेक नेटले, राहुल वराडे आदी उपस्थित होते.

Protected Content