धावत्या रेल्वेत गोळीबार : चौघांचा मृत्यू

पालघर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जयपूर ते मुंबई दरम्यानच्या एक्सप्रेसमध्ये आरपीएफने केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली आहे.

आज पहाटे पालघर शहराजवळ रेल्वेत फायरिंग झाली. प्राप्त माहितीनुसार २९५६ अप जयपूर ते मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमधील बी-५ या डब्यात पाच वाजेच्या सुमारास गोळीबार झाला. यात धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच आरपीएफच्या कर्मचार्‍याने हे कृत्य केले आहे.

आरपीएफच्या कॉन्स्टेबल चेतन याने बी-५ क्रमांकाच्या बोगीस अंधाधुंद गोळीबार केला. यात चार जणांच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन प्रवासी तसेच आरपीएफचे एएसआय टीका राम यांचा देखील समावेश आहे. यामुळे या बोगीत एकच खळबळ उडाली. रेल्वे सुरक्षा कर्मचार्‍यांनी धाव घेत चेतन याला ताब्यात घेतले. मीरा रोड स्थानकात ट्रेन थांबवून मृतदेह उतरवण्यात आले आणि शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत.
आरपीएफच्या कर्मचार्‍याने नेमका कशामुळे गोळीबार केला हे मात्र समजू शकले नाही.

Protected Content