खोट्या जुमल्यामुळे भाजवर खटला दाखल करा : सचिन सावंत

नवी दिल्ली | ‘हिंदू खतरे मे है’ हे वाक्य काल्पनीक असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. यामुळे खोटा जुमला दिल्या प्रकरणी भाजपवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली आहे.

नागपूरचे रहिवाशी मोहनीश जबलपुरे यांनी १० सप्टेंबर २०२१ रोजी माहितीच्या अधिकारातून केंद्रीय माहिती अधिकार्‍याला एक प्रश्न होता. ‘हिंदू खतरे में है’ असं सांगितलं जात आहे. त्याबद्दलची माहिती आणि पुरावे द्यावेत, अशी मागणी जबलपुरे यांनी केली होती. त्यावर माहिती अधिकार्‍याने हे उत्तर दिलं आहे. काल्पनिक प्रश्नांना उत्तर देणं हे आमचं काम नाही. तसेच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही आमच्याकडे नाही, असं सांगतानाच त्यामुळे तुम्ही गृहखात्याकडे त्याची विचारणा करावी, अशा सूचनाही माहिती अधिकारी व्ही. एस. राणा यांनी जबलपुरे यांना केली आहे.

आता याच मुद्यावरून कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. आज त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, हिंदू धर्म संकटात आहे हा भाजपाचा जुमलाच होता हे स्वतः अमित शहांच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पण या भयानक जुमल्यातून भाजपाने सत्तेसाठी विद्वेषाचे वातावरण पसरवले. धार्मिक उन्मादातून देशात मॉब लिंचिंग झाले, हत्या झाल्या. त्याबद्दल भाजपा नेत्यांवर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

यासोबत, सोयाबीनच्या भावावरूनही सावंत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सोयाबीनचे भाव सातत्याने पडत आहेत.  एकेकाळी शेतकरी दिंडी काढून चिपळ्या वाजवत शेतकर्‍याची कणव आहे, असे दाखवून सोयाबीनला भाव मागणारे देवेंद्र फडणवीस मोदी सरकारचा निषेध करणार का? सोयाबीन आयातीचा निर्णय थांबवण्यास मोदींना भाग पाडणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

 

Protected Content