शेतकर्‍यांची केंद्र सरकार सोबतची बैठक निष्फळ; आंदोलन चिघळण्याची शक्यता

नवी दिल्ली । राजधानी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकरी व केंद्र सरकारमधील आजच्या प्रदीर्घ बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे सुरु असलेले आंदोलन आता अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. सरकारची डोके दुखी बनलेले हे आंदोलन शेतकर्‍यांचा म्हणण्यानुसार चर्चेने सरकार सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यास केंद्र सरकारला यश येत नसल्याचे दिसत आहे. आंदोलक शेतकर्‍यांसोबत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची झालेली आजची बैठक पुन्हा निष्फळ ठरलेली आहे. या ही बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. केंद्रीय मंत्र्यांनी ठेवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी नाकारला आहे. आता पुन्हा गुरुवारी अर्थात दि. ३ रोजी बैठक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. अर्थात, तोवर आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

Protected Content