मंडळ अधिकाऱ्याच्या गैरहजेरीला शेतकरी रडकुंडीस – तात्काळ बदलीची मागणी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ‘मारवड’ भागातील मंडळ अधिकाऱ्याच्या गैरहजेरीला कंटाळून ग्रामस्थांनी त्यांची बदली करावी अशी मागणी करत निवेदन दिले आहे.

या निवेदनात, ‘मारवड’ या भागाचे मंडळ अधिकारी दिलीप पुंजू पाटील हे मारवड येथील सजा कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून आले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून शेतकऱ्यांच्या नोंदी वेळेवर होत नाहीत, कुठल्याही शासकीय अर्जाचा निपटारा वेळेत होत नाही. तसेच ग्रामस्थांनी फोन केला असता फोन न उचलणे किंवा चुकीची माहिती देत दिशाभूल करणे असल्याचे सांगितले असून सदर मंडळ अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ बदली करावी अशी मागणी मारवड ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

 

Protected Content