कर्मचारी भविष्य निधीच्या नियमांमध्ये बदल

EPFO1

नवी दिल्ली वृत्तसंस्था । नोकरदार आपल्या भविष्यातील तरतुदीसाठी कर्मचारी भविष्य निधीचा विचार करतो. ही योजना सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह मानली जाते. अनेकजण या योजनेतील गुंतवणुकीलाच पसंती देतात. यातून कोणत्याही जोखमेशिवाय निश्चित असा परतावा मिळत असल्याने लोकांमधून याला प्राधान्यक्रम दिले जाते.

दुसरीकडे या याजनेतील गुंतवणुकीमुळे कर बचत देखील होते. सध्या सरकारने पीपीएफशी संबंधित जुने नियम बदलले आहेत. हा करात सवलत मिळवण्याचा चांगला पर्याय आहे. आता सरकारने कर्मचारी भविष्य निधीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

हे बदल खालीलप्रमाणे,
1.नव्या नियमाप्रमाणे कर्मचारी भविष्य निधी खातेधारक एका वर्षामध्ये कितीही वेळा पैसे जमा करु शकतो. या आधी एका आर्थिक वर्षामध्ये केवळ 12 वेळाच पैसे जमा करता येत होते. दरम्यान, 1 वर्षात एकूण 1.5 लाख रुपयेच जमा करता येऊ शकतात.

2. नव्या नियमानुसार कर्मचारी भविष्य निधी खातेधारकाच्या कर्जावरील व्याजदर 1 टक्के झाला आहे. आधी पीपीएफ खातेधारकाला घेतलेल्या कर्जासाठी 2 टक्के व्याज होते, ते आता 1 टक्के करण्यात आले.

3. खातेधारकाच्या मृत्यूनंतर कर्जावरील व्याजाची जबाबदारी खात्याच्या वारसाची असेल.

4. आता कर्मचारी भविष्य निधी खातेधारक कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या शाखेतून आपली कितीही पीएफ रक्कम काढू शकणार आहे. पोस्ट खात्याने यासाठी परवानगी दिली आहे. आधी याची मर्यादा 25 हजार रुपये इतकी होती.

5. नव्या नियमांनुसार कर्मचारी भविष्य निधी खातेधारकाला दुसऱ्या देशाचं नागरिकत्व ग्रहण करायचं असेल तर त्या स्थितीत खात्याचा काळ पूर्ण होण्याआधीच बंद करता येणार आहे. याआधी हा नियम अस्तित्वात नव्हता. पीएफ खात्याची कालमर्यादा पूर्ण होण्याआधीच बंद करायचं असेल, तर त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. यात संबंधित खातेधारकाच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज असेल तर संबंधित खाते बंद करता येईल ही एक तरतूद आहे.

Protected Content