एल्गार परिषद प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न झाला होता : दिग्विजय सिंह

digvijay sing

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील भाजप सरकारने आपल्याला अर्बन नक्षल आणि एल्गार परिषद प्रकऱणात गोवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

अर्बन नक्षलच्या नावाखआली जी नावे गोवण्यात आली ती राज्य सरकारच्या दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून तत्कालीन फडणवीस सरकारवर होत आहे. यावर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी अर्बन नक्षल आणि एल्गार परिषद प्रकऱणात गोवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर, याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला फोनवरून मदत करु असे सांगितले होते आणि आपण जेव्हा त्यांना खटला भरा असे सांगितले, त्यानंतर आपल्याला कधीच फोन आला नसल्याचेही सिंहांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याची मागणी दिग्विजय सिंहांनी केली आहे.

Protected Content