भाजप जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ”ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला.. बाबासाहेबांनी दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाजसुधारणेसाठीही अनेक कामे केली. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. पण, ते अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत, ज्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते. यंदा संपूर्ण देश त्यांची 133 वी जयंती साजरी करत आहे.

भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार मनले जाणारे डॉ भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री देखील होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते. यंदा संपूर्ण देश त्यांची 133 वी जयंती साजरी करत आहे. डॉ भीमराव आंबेडकर ज्यांना बाबासाहेब म्हणूनही ओळखले जाते. ते एक प्रख्यात विद्वान, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते.

ज्यांनी सामाजिक न्याय आणि समानतेसाठी आपले जीवन समर्पित केले होते. त्यांची जयंती सामाजिक सलोखा आणि एकता यासाठी एकत्र येण्याचा दिवस म्हणून साजरी केली जाते. डॉ. आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशात झाला त्यावेळी भारतातील जातिव्यवस्था अतिशय कठोर असल्याने त्यांना लहानपणापासूनच भेदभावाला सामोरे जावे लागले. मात्र, त्यांनी शिक्षण क्षेत्रात खूप मेहनत घेतली आणि परदेशातही शिक्षण घेतले. त्यांनी शिक्षणात प्रावीण्य मिळवले आणि कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. याशिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर ते भारतात परतले आणि कायद्याचा सराव सुरू केला.

दलित समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला आणि शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमध्ये समानतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उत्थानासाठी अनेक चळवळींचे नेतृत्व केले. भारतीय संविधानात आरक्षण प्रणाली समाविष्ट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते संविधानातील मूलभूत अधिकार आणि संघराज्य रचनेचे खंबीर पुरस्कर्ते होते त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे संविधानातील योगदान महत्त्वपूर्ण योगदानामुळे सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि समान संधी प्रदान करणाऱ्या संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

संविधान सभेसाठी निवड झाल्यावर मूलभूत अधिकार, संघराज्य रचना आणि अल्पसंख्याक आणि वंचितांसाठी संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विशेषत: धार्मिक स्वातंत्र्य, अस्पृश्यता निर्मूलन आणि शोषणापासून संरक्षण यांसारख्या अधिकारांवर भर दिला. एक मजबूत केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये अधिकारांचे विभाजन सुनिश्चित करण्यासाठी बाबासाहेबांनी संघराज्य पद्धतीचे समर्थन केले. अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षणासाठी देखील त्यांनी कार्य केले. भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्ती, आंबेडकर हे एक न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक देखील होते. ज्यांनी दलित यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी, महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. अशा या महामानवाला 133 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय एम फाउंडेशन येथे पुष्पहार घालून करण्यात आला .

यावेळी लोकसभेचे उमेदवार स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर राधेशाम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, सरचिटणीस अरविंद देशमुख, विधानसभा निवडणुक प्रमुख विशाल त्रिपाठी, महेश जोशी, सुनील खडके, राजेंद्र मराठे, उदय भालेराव, मुकुंद मेटकर, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, नीला चौधरी, दीपमाला काळे, सुचिता हाडा, गायत्री राणे, नंदिनी दर्जी, ज्योती निंभोरे, केतकी पाटील, चित्रा मालपाणी, राजू मराठे, राहुल पाटील, मंडल अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी प्रसिध्दी प्रमुख मुविकोराज कोल्हे उपस्थित होते.

Protected Content