धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वयोवृध्दाचा जागीच मृत्यू

railway dhakka

जळगाव प्रतिनिधी । धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वयोवृध्दाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहीत अशी की, दिनकरराव त्र्यंबक गुरव (वय-80) रा. रथ चौक हे आज गजानन महाराज यांच्या मंदीरात जावून येतो असे सांगुन सकाळी 11 वाजेच्या सुमारास घरून निघाले. त्यांना ऐकायला कमी येत असल्याने प्रजापत नगर, ममुराबाद येथील रेल्वे नाक्याजवळ रेल्वे पट्टा ओलांडतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, भाऊ, सुना व नातवंडे असा परीवार आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content