धरणगाव नगरपालिकेत शहिदांना श्रध्दांजली

धरणगाव प्रतिनिधी । पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आज सकाळी येथील नगरपालिकेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.उरीतील दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही देशवासियांच्या मनात कायम आहेत.त्यातच आजचा हा हल्ला सर्वात मोठा अतिरेकी हल्ला मानला जात आहे. दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिल्याशिवाय शांत बसता येणार नाही अशी भावना सर्व देशवासी व्यक्त करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर धरणगाव नगरपालिकेत शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शहरातील नाईट ग्रुप व नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content