धरणगावातील शिवाजी महाराजांचा पुतळा अतिक्रमणच्या विळख्यात

dharangaon news

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव येथील गेल्या काही दिवसांपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अतिक्रमणाचा विळखा कायम स्वरूपी दिसून येत आहे. हे अतिक्रमण नगरपालिकेने काढवी, अशी मागणी नागरीकांकडून करण्यात येत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील महत्वाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वर्दळ दिसून येते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गावातील नागरिक ग्रामीण भागातील नागरिक गाड्या यांची वर्दळ कायमस्वरूपी दिसून येत असते. शाळेत जाणारी विध्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात. नगरपालिका मुख्यधिकारी यांना विविध संघटनांनी या सामस्या सोडविण्यासाठी अनेकवेळा मागणीचे निवेदन देवून साफ दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होत आहे. यामुळे नागरीकांकडून नाराजीचा सुर दिसून येत आहे.

Protected Content