पिक विम्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा- स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना सन २०२२-२०२३ अंतर्गत पात्र लाभार्थी ७७ हजार शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याची रक्कम  ६० ते ७० हजार रुपये हेक्टरी तात्काळ खात्यात जमा करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांची पत्रकार परिषदेत मागणी केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असून १८ जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार पीक विम्याचा कालावधी  संपुष्टात आल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम कमी व जास्त तापमानाची हेक्टरी ६० ते ७० हजार रुपये ३ आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक  तरी शासन निर्णयाच्या अनुषंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषद द्वारे केली आहे.

जानेवारी महिन्यात तापमान सलग पाच दिवस ८ डिग्री सेल्सिअसच्या कमी राहिल्याने जिल्ह्यातील ४७ महसूल मंडळातील शेतकरी पात्र झाले असून त्यांना हेक्टरी २६५०० रक्कम देय आहे, एप्रिल महिन्यात तापमान सलग पाच दिवस ४२ डिग्री सेल्सिअसच्या वर राहिल्याने ४६ महसूल  मंडळातील शेतकरी पात्र असून त्यांना हेक्टरी ३५ हजार रुपये रक्कम देय आहे, मे महिन्यामध्ये तापमान सलग पाच दिवस ४५ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त राहिल्याने ५० महसूल मंडळातील शेतकरी पात्र असून त्यांना हेक्‍टरी ४३ हजार ५०० रुपये देय असून असे एकूण कमी व उच्च तापमानाचे हेक्‍टरी ६० ते ७० हजार रु. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २२ ऑगस्ट पर्यंत जमा करणे बंधनकारक आहे. कारण शासन प्रशासन व विमा कंपन्यांकडे सदर कमी व उच्च तापमानाचा संपूर्ण डाटा मागील जवळपास आठ महिन्यांपासून उपलब्ध असल्याने सदर कमी व उच्च तापमानाच्या नुकसानीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, या आशेने शेतकरी वाट बघत असल्यामुळे सदर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या विम्याची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.

Protected Content