भरधाव कारच्या धडकेत रिक्षा चालक जागीच ठार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील उमाळा बसस्थानकाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दिलेल्या धडकेत रिक्षा चालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता कारवरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील उमाळा गावातील बसस्थानकाजवळ बुधवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ३७६८) या प्रवाशी रिक्षाला भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच ०२ बीआर ४३९१) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा चालक राजू ओमप्रकाश साहू (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर रिक्षात असलेले प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.  या अपघातात रिक्षासह कारचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी हरीज्ञ मोहन साहू (वय-३०) रा. वाघ नगर, जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

Protected Content