वसीम रिजवीला अटक करण्याची मागणी

पारोळा प्रतिनिधी । येथील मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने वसीम रिजवी याला अटक करा, अशी मागणी मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने पीआय भंडारे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

इस्लाम मेसेज ऑफ पीस इस्लाम शांतीच्या संदेश देणार आहे. कुरआन शरीफच्या तत्वावर चालणारा हा धर्म आहे. कुरान शरीफ शांती सद् भावनेचे प्रतीक असून वासना तसेच संसारात सर्व वाईट गोष्टीला विरोध करणारा धर्म आहे. अशा कुरान शरीफ मधील 26 सुर् हे काढण्याची मागणी उत्तर प्रदेश येथील लखनऊ शहरचे शिया वक्फ बोर्ड माजी अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कुरान मधला कोणताही शब्द बदलता येत नाही. यापूर्वीही त्याने असे अनेक किस्से केले आहे. त्याच्या फक्त हिंदू मुस्लिम यांच्यात वाद निर्माण करणे व कायम प्रसिद्धी मध्ये राहणे हेच आहे. या कारणाने सर्व शिया समाजाने त्याच्या तीव्र विरोध केला आहे. त्याच्या भाऊ-बहीण आई व पत्नी यांनी पण त्यांच्याशी नाते तोडले आहे. तरी अशा समाज कंटकला अटक करा व कारवाई करा अशी मागणी मोहम्मद पठान, डॉक्टर आसिफ, इमरान शेख ,हांजी सय्यद समीर,,नूरुद्दीन शेख शराफत यांनी निवेदनाद्वारे केली.

 

Protected Content