वीजेची वायर कट केल्याच्या कारणावरून महिलेसह दीराला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीजेची वायर कट केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून ३० वर्षीय महिलेसह दीराला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शहरातील समता नगरात मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, राणी सलीम शेख (वय-३०) रा. समता नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्याच्या घराची वीजेची वायर कट केल्याचे विद्यूत प्रवाह खंडीत झाला होत. त्यावेळी राणी शेख यांचा दीर तन्वीर शेख हा घराबाहेर आला तेव्हा संशयित आरोपी अनवर शेख इब्राहिम शेख याच्यासह इतर दोन ते तीन जण बसलेले होते. तन्वीर शेख म्हणाला की, कुणीतरी विजेची वायर कट केली. असे बोलल्याचा राग आल्याने अनवर शेख इब्राहिम शेख याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी राणी सलीम शेख ह्या मध्यस्थी करण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील मारहाण केली व चाकूसारख्या वस्तूने मारून हाताला दुखापत केली. दरम्यान महिलेने रामानंदनगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अनवर शेख इब्राहिम शेख रा. समता नगर, जळगाव याच्या विरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश पाटील करीत आहे.

Protected Content