भुसावळात दूषित पाणीपुरवठा ; नगरसेवकांची आक्रमक भुमिका

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील नगरपालिका प्रशासनाकडून पुरविला जाणारा पाणीपुरवठा दूषित होत आहे. या समस्येवर विरोधी गटातील नगरसेवकांनी आक्रमक भुमिका घेत पाणीपुरवठा अभियंत्यांना आज घेराव घालत जाब विचाराला आहे.

शहरात सध्या अनियमित व अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. शहरात गेल्या ८-१० दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या सुरु असलेला पाऊस त्यातच हतनुर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पाणीपुरवठा करतांना अडचणी येत असल्याची भुमिका पालिका प्रशासनाने मांडली होती. मात्र पावसामुळे ही समस्या गेल्या ८-१० दिवसांपासून निर्माण झाली आहे. मात्र या अधिपासून पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. ही बाब लक्षात घेत २७ रोजी पालिका विरोधी राष्ट्रवादी गटाच्या नगरसेवकांनी  नगरपालिकेचे फिल्टर हाउस गाठत पाहणी केली. दरम्यान, त्यांनी तापीतील बंधार्‍यापासून ते फिल्टर हाऊसपर्यंत पाणी येणार्‍या प्रत्येक यंत्रणेची पाहणी केली. यावेळी कृउबा सभापती सचिन चौधरी, विरोधी गटनेते दुर्गेश ठाकूर, उल्हास पगारे, शे. शाकीर, सलीम पिंजारी, प्रदिप देशमुख, सचिन पाटील, साजिद शेख आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवकांनी पाण्याचा नमुना घेतले.

पाणीपुरवठा अधिकार्‍यांना घेराव

विरोधी गटातील सदस्यांनी फिल्टर हाउसची पाहणी केल्यानंतर पाण्याचा नमुना घेत पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख यांना नगरसेवक व पदाधिकारी यांनी घेराव घालत गटनेता दुर्गेश ठाकूर व सचिन चौधरी यांनी, प्रलंबित असलेली अमृत योजनेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत. पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. अमृतच्या फिल्टर प्लँटचे नियोजन नाही. तापी नदीतील अमृतच्या बंधार्‍याबाबतचा अहवाल नाही. त्यामुळे शहरात अंथरलेल्या पाईपलाईनमधून फक्त हवाच पुरवणार का? जीर्ण झालेल्या फिल्टर प्लँट ऐवजी नवीन फिल्टर प्लँटच्या प्रस्तावाकडे सत्ताधर्‍यांनी दुर्लक्ष केल्याचे म्हणत शहरातील कोणत्याही भागात गेल्यास त्या ठिकाणच्या पाण्याचा नमुना घेतल्यास तो दुषितच आढळून येईल. यातील तथ्य तपासायचे असल्यास प्रशासनाने स्वत: कुठल्याही भागातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविल्यास  ते दुषितच आढळतील असे सांगितले. यावर पाणीपुरवठा अभियंता सतीष देशमुख यांनी प्रशासनाची बाजू मांडत गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्यात अडचण निर्माण झाली. नदी पात्रातून गढूळ पाणी उचलले जात आहे. यावर उपाय म्हणुन पाणी शुद्धीकरणासाठी आलमचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यासह आवश्यकत्या उपाययोजना प्रशासनातर्फे राबविण्यात येत असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Protected Content