फेसबुकने वाढवली काँग्रेसची चिंता ; ६८७ पेसेज आणि अकाउंट केले डिलिट

facebook

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणूकीत सोशल मीडियावरील प्रचाराने वेग घेतला असतांना फेसबुकने काँग्रसची पेजेस डिलीट केली आहेत. फेसबुकने फेसबुकवरील काँग्रेसशी संबंधित ६८७ पेसेज आणि अकाउंट डिलिट केले आहेत. काँग्रेसशी संबंधित काही लोकांनीच ही कॉंग्रेस पेजेस तयार केली होती, याप्रकाराने कॉंग्रेसची निवडणूक काळात कोंडी झाली आहे.

 

काँग्रेसशी संबंधित या फेसबुक पेज आणि अकाउंटवरून खोट्या बातम्या, खोटी माहिती प्रसारीत केली जात होती. त्यामुळे हे पेजेस हटविण्यात आल्याचं फेसबुकने म्हटलं आहे. निवडणूक काळात खोट्या बातम्या पसरविणारे अकाउंट बंद करण्यात येणार असल्याचं फेसबुकनं म्हटलं होतं. त्याचा पहिला फटका काँग्रेसला बसला आहे. फेसबुकने याचे स्पष्टीकरण देतांना सांगितले की, कॉंग्रेस संदर्भातील या फेसबुक पेजेसची तपासणी करण्यात आली होती. खोटी अकाउंट तयार करून ही पेजेस तयार करण्यात आली होती आणि त्यावरून संबंधितांनी स्वत:चा अजेंडा राबवायला सुरुवात केली होती. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि इतर राजकीय पक्षांवर टीका करण्यात येत होती, असं फेसबुकने स्पष्ट केले आहे. फेसबुकवर खोटे अकाउंट बनवून यूजर्सने स्वत:ची खरी ओळख लपवली होती. हे लोक काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित लोकांशी संबंधितच होते, हे आमच्या तपासातून उघड झालं, असं फेसबुकचे सायबर स्पेस पॉलिसी प्रमुख नथानियल ग्लिकर यांनी सांगितले. यूजर्सचा व्यवहार पाहूनच त्याचं खातं डिलिट करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, फेसबुकने आज पाकिस्तानी सैन्याच्या जनसंपर्क विभागाशी संबंधित फेसबुकवरील १०३ पेजेसही हटवले आहेत. हे फेसबुक पेजेस पाकिस्तानातूनच ऑपरेट केले जात होते.

Add Comment

Protected Content