मुक्ताईनगरात तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक संतप्त

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगरमधील प्रभाग क्रमांक 13 विश्वकर्मा मंदिर येथील रहिवासींच्या घरासमोर अक्षरशा गटारीचे पाणी रस्त्यावर आले आहे. या पाण्यातून शेवाळ, किडे आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी नगरपंचायतीस वारंवार पत्र्यव्यवहार करुन देखील दुर्लंक्ष होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर मधील प्रभाग क्रमांक 13 विश्वकर्मा मंदिर येथील रहिवासी यांच्या घरासमोर अक्षरशा गटारीचे पाणी रस्त्यावर आले आहे.  व त्या पाण्यामध्ये शेवाळ व किडे पडले आहे. तरी याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी नगरपंचायत येथे पत्रव्यवहार केला तसेच स्थानिक नगरसेवकांना सुद्धा संपर्क केला असता ते फोन उचलायला तयार नाही. तरी सध्या कोरोना ने राज्यात धुमाकूळ घातला आहे. अशा दूषित पाण्यामुळे घरातील नागरिकांचे व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असा आरोप येथील नागरिकांचा आहे. तरी स्थानिक नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी याबाबत लक्ष घालून येथील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Protected Content