जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे २५ वर्षाआतील खेळाडूंसाठी बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृहात रविवार १८ ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे. स्पर्धला सुरुवात सकाळी १०.०० वाजता करण्यात येईल.
स्पर्धेतील टाईम कंट्रोल १५ मिनिटस व १० सेकंद इंक्रिमेन्ट देण्यात येईल.स्पर्धेत १जानेवारी १९९४ जन्म तारखेनंतरचे खेळाडू पात्र ठरतील.स्पर्धेत २५ वर्षाआतील प्रथम १० खेळाडूंना पारितोषिक देण्यात येतील. त्यात प्रथम बक्षीस रुपये १०००, द्वितीय बक्षीस रुपये ७००, तृतीय ५०० रुपये, चवथे ४०० व पाचवे बक्षीस ३०० रुपये तर ६ ते १० क्रमांक असलेल्या खेळाडूंना बुध्दिबळ संच बक्षीस देण्यात येईल.वयोगट ९ व १४ तसेच उत्कृष्ट ३ मुली अशा प्रत्येक वयोगटात पहिल्या तीन खेळाडूंना बुध्दिबळ संच देण्यात येईल. स्पर्धकांनी नावनोंदणी कांताई सभागृह येथे परेश देशपांडे (मोबा. ९२२५२६४२१२) यांचेकडे करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.