विवाहितेला मारहाण करून विनयभंग करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावात राहणारी विवाहितेला हिला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात राहणारी ३८ वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतात. ५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातीलच तुषार गोपाळ पाटील, गोपाळ शामराव पाटील आणि सविता गोपाल पाटील यांना उसनवारीने दिलेले पैसे मागितल्याचा राग आला. त्यानी महिलेला व तिच्या पतीसह बेदम मारहाण केली. यातील संशयित आरोपी तुषार पाटील याने विवाहितेचा हात पकडून अश्लिल शिवीगाळ केली. विवाहितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केला व जीवे ठार मारण्याची देखील धमकी दिली. याबाबत महिलेने यावल न्यायालयात धाव घेऊन तक्रार दिली होती. बुधवार ३० मार्च रोजी न्यायालयाच्या आदेशान्वये संशयित आरोपी तुषार गोपाळ पाटील (वय-३०), गोपाळ शामराव पाटील (वय-५५) आणि सविता गोपाळ पाटील (वय-३६) यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय देवरे करीत आहे

 

Protected Content