उन्मेषदादांच्या इशार्‍यानंतर चाळीसगावला मिळणार मुख्याधिकारी !

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव नगरपालिकेला २४ तासांमध्ये मुख्याधिकारी न मिळाल्यास मंत्रालयाच्या पायर्‍यांवर उपोषणाचा इशारा खा. उन्मेषदादा पाटील यांनी दिल्यानंतर आज राज्य शासनाने ही मागणी मान्य केली आहे.

याबाबत वृत असे की, नगरोत्थान योजनेत ९० कोटी,१५० कोटींच्या महत्वाकांक्षी भुयारी गटार योजनेतील पहिल्या टप्प्यातील ७० कोटी, २२ कोटींचा घनकचरा प्रकल्प याच बरोबर कोट्यावधी रुपयांची शहर सुशोभीकरण, एलइडी विद्युत दिवे योजना अशा अनेक योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मोठा निधी आणून शहराच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू होते. मात्र गेल्या बारा महिन्यापासून चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने शहरवासीयांची कामे खोळंबली होती. तसेच विकास कामांची गती मंदावली होती. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. यासाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी नगर सचिवांना भेटून येत्या चोवीस तासात मुख्याधिकारी नेमणूक न झाल्यास मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाचा इशारा दिला होता. या दणक्याने अखेर यंत्रणा खडबडून जागी झाल्याने चाळीसगाव पालिकेचा वनवास अखेर संपला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयास नवीन मुख्याधिकारी नियुक्तीबाबत आदेश प्राप्त झाले असून खासदारांच्या दणक्याने पालिकेला मुख्याधिकारी मिळत असल्याने शहरवासीयांमध्ये खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे..

गेल्या वर्षभरापासून मुख्याधिकारी नसल्याने चाळीसगावातील कामे खोळंबली आहेत. तसेच नागरिकांचा रोष देखील वाढत असल्यााने नगर विकास सचिव पाठक यांच्या दालनात त्यांची भेट घेऊन चोवीस तासांत मुख्याधिकार्‍यांची नेमणूक न झाल्यास मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाचा इशारा दिला होता. या अनुषंगाने नवीन मुख्याधिकारी नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी यांना शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. यामुळे पालिकेला लवकरच नवीन मुख्याधिकारी नियुक्ती करण्यात येणार आहे. खासदार उन्मेषदादा पाटील यांचा खंबीर पवित्रा घेतल्याने ही नियुक्ती होणार असल्याने त्यांच्या भूमिकेचे शहरवासीयांकडून स्वागत होत आहे.

Protected Content