भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल भुसावळ शहर आणि ग्रामीण भारतीय जनता पक्षाने जोरदार स्वागत केले. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू-पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष केला. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आनंदोत्सवात भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष प्रशांत पाटील, गोलू पाटील, किरण कोलते, संदीप सुरवाडे, माजी शहराध्यक्ष युवराज लोणारी, व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, बाजार समिती सभापती अनिल वारके, निळकंठ भारंबे, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, ललित मराठी, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रवीण इखनकर, भालचंद्र पाटील, सुनील महाजन, सदानंद उन्हाळे, पवन बुंदेले, श्रेयस इंगळे, जयंत माहुरकर, अनिता आंबेकर, मनीषा सैतवाल, रवी ढगे, शंकर शेळके, पुंडलिक पाटील, राहुल तायडे, अल्बर्ट तायडे, कुणाल येवले, लखन रणधीर, गोपीसिंह राजपूत, रवींद्र खरात, रहमान शेख, तुषार चिंधडे, मुकेश मोरे, नामदेव चौधरी, अनिल शेलार, भावेश चौधरी, धनराज बाविस्कर, मोहन पाटील, संजय भीरुड, पराग भोळे, भैय्या महाजन, अमोल महाजन, सागर चौधरी, नितीश इंगळे, जितेंद्र कोळी, रमाशंकर दुबे, शेखर धांडे, नरेंद्र पाटील, शैलेंद्र ठाकरे, दुर्गेश घुले आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.