Breaking News: : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

Bhagat Singh Koshyari governer

 

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची तयारी सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खुद्द राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे या संदर्भातला अहवाल पाठवला आहे. त्यामुळे रात्री साडेआठनंतर महाराष्ट्रात कधीही राष्ट्रपती राजवट लागू शकते.

 

राष्ट्रवादी काँग्रेसने असमर्थता दाखवल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल यासंदर्भातली शिफारस राज्यपालांनी केले आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजप, शिवसेना आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसला रात्री 8.30 पर्यंत सरकार स्थापन करण्याची मुदत दिली आहे. मात्र त्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे.

Protected Content