मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची तयारी सुरु झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यपाल हे भाजपाचे बाहुले आहेत का?’ अशी खोचक टीका काँग्रसेचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
शिवसेना आणि भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रवादीला आमंत्रण दिले आहे. राष्ट्रावादीला सत्ता स्थापन कऱण्यात अपयश आल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर सचिन सावंत यांनी ट्वीट करत ‘राज्यपाल हे भाजपाचे बाहुले आहेत का?’. सत्तास्थापनेसाठी पुरेसे प्रयत्न न करता. तसेच इतर पक्षांना पुरेसा वेळ न देता. एवढेच काय तर राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर त्यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली असेल आणि हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल,असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.