Breaking News : कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतले विष; रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सततची नापीकी आणि कर्जबाजारातून कंटाळलेल्या जळके येथील शेतकऱ्याने विषारी औषध सेवन केले होते. सोमवारी २४ जून रोजी रात्री १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. संभाजी कडूबा पाटील वय ५० रा. जळके ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजी पाटील हे आपल्या परिवारासह जळगाव तालुक्यातील जळके गावात वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवार १९ जून रोजी दुपारी २ वाजता त्यांनी शेतातील सततची नापीकी आणि कर्जबाजाराला कंटाळून त्यांनी विष प्राशन केले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी २४ जून रोजी रात्री १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी २५ जून रोजी १० वाता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

Protected Content