रोहिणी येथे भाजप कार्यकर्त्यांनी अडविला कृषीमंत्र्यांचा ताफा

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील रोहिणी येथील रेल्वे अंडरपासमध्ये साचणार्‍या पाण्यावर उपाययोजना करावी या मागणीसाठी आज तालुका दौर्‍यावर असणारे कृषीमंत्री दादा भुसे यांचा ताफा भाजप कार्यकर्त्यांनी अडविला.

याबाबत वृत्त असे की, रोहिणी रेल्वे अंडर पासमध्ये पाणी तुबल्यामुळे ७ ते ८ गावांचा चाळीसगांव तालुक्याशी संपर्क तुटला, सभोवतालच्या पिंपळगाव, राजदेरे, राजदेहरे तुका तांडा, राहदेहरे गावठाण तांडा, राजदेहरे सेटलमेंट, घोडेगाव, खराडी, शिंदी, जूनपणी,ओढरे, करजगाव, पाटणा इत्यादी गावांचा चाळीसगांव शहराशी संपर्क तुटला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सभोवलच्या परिसारतील ग्रामस्थना व आजारी पेशन्टना अनेक अडचणी उद्भवत आहे. उपचराआभावी एखाद्या पेशन्ट चा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्‍न उपस्थित करत आज भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांचा ताफा अडविला.

याप्रसंगी कृषी मंत्री दादा भुसे यांना रोहिणी रेल्वे गेट जवळ नेऊन त्यांना सद्य परस्थिती दाखवण्यात आली. मंत्री मोहदयानी परस्थिती पाहून तात्काळ रेल्वे गेट खुले करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले..तसेच ढगफुटी व निसर्गाचा प्रकोप होऊन झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे जमिनीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला त्यामुळे सर्व शेतकर्‍यांचे सरसकट पंचनामे करून परिसरातील रोहिणी, हातगाव, अंधारी, तमगव्हान, पिंपळवाड, तळेगाव कृष्णातांडा करंजगाव घोडेगाव खराडी पिंपळगाव जुनापाणी राजदेहरे सेटलमेंट तांडा म्हारवाडी इत्यादी गावांमध्ये पंचनामे करून सरसकट मदत मिळाली पाहिजे  अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली.

याप्रसंगी भाजपा चाळीसगांव विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल नागरे, भाजपा भटके विमुक्त आघाडी जळगांव जिल्हा सरचिटणीस नितिन सोनवणे, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते वाल्मिक नागरे, माजी उपसरपंच प्रकाश सगळे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, युवा मोर्चा चिटणीस दीपक घुगे, युवा शाखा अध्यक्ष विनोद चौधरी, घनश्याम डिघोळे, रामहरी ताठे, भावलाल नागरे यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थिती होती.

 

Protected Content