पक्ष सोडणाऱ्यांना आता जनता हद्दपार करणार – आ. सावकारे (व्हिडीओ)

भाजपाच्या चिन्हावर निवडून येतात आणि पक्ष सोडतात, अश्यांना जनता हद्दपार करणार- आ. सावकारे
वरणगाव दत्तात्रय गुरव । भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि नंतर पक्ष सोडतात. अश्यांना आगामी निवडणूकात जनता माफ करणार नसून जनताच निवडणुकीतून हद्दपार करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले. वरणगाव येथे भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमाला राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिल काळे, नगरसेविका माला मोढे, शहराध्यक्ष सुनील माळी, हाजी उल्लउद्दीन शेठ, ॲड. ए.जी. जंजाळे, युसुफ खान, दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विवेक शिवरामे, जिल्हाउपाध्यक्ष मिलींद भैसे, डॉ सदीक अझर उल्ला, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, मनोहर सराफ, रूख्मिणी काळे, प्रणिता पाटील, मुस्लिम अन्सारी, संतोष खोरखाडे, विनोद पाटील, अतुल जावरे यांची उपस्थिती होते. 

यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. डॉ. राजेंद्र फडके यांची रेल्वे बोर्डावर नियुक्ती केल्याबद्दल आमदार संजय सावकारे यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ. राजेद्र फडके यांनी सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगराला जाण्यासाठी भुयारी मार्ग व बोदवडकडे जाण्यासाठी नागेश्वर जवळ उड्डाणपुल व वरणगाव रेल्वेमार्गचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. 

 

Protected Content