विरोधी पक्षाच्या काळ्या जादूमुळे भाजप नेत्यांचा मृत्यू : प्रज्ञा सिंह ठाकूर

भोपाळ (वृत्तसंस्था) विरोधी पक्षांनी केलेल्या काळ्या जादूमुळे भाजप नेत्यांचा मृत्यू झाल्याचा हास्यास्पद आरोप भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी लावला आहे.

 

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपा कार्यालयात सोमवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा नेते बाबूलाल गौर यांच्यासाठी श्रद्धांजली सभा ठेवण्यात आली होती. यात प्रदेश भाजपाच्या नेत्यांनी दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या दरम्यान भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनीही भाजपा नेत्यांबाबत शोक व्यक्त भाजपा नेत्यांच्या मृत्यूला विरोधी पक्षाने केलेली मारक शक्तीचा प्रयोग जबाबदार असण्याची शक्यता व्यक्त केली. यावेळी प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, मी जेव्हा निवडणूक लढवित होते. त्यावेळी एक महाराज आले होते. त्यांनी मला सांगितले की, वेळ खूप खराब आहे, तुमची साधना वाढवा. विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग तुमच्या पक्षावर आणि नेत्यांवर करत आहे. त्यामुळे सावधान राहा, असे सांगितले.

Protected Content