मोठी बातमी : गायींची वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले; २५ गायींची सुटका !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील यावल नाक्याजवळून बेकायदेशीरित्या दोन ट्रकमधून गायींची वाहतूक होत असतांना आडवून गो प्रेमींच्या सतर्कतेने तब्बल २५ गायींना जीवदान मिळाले आहे. तर दाटीवाटीने झालेल्या वाहतूकीमुळे दोन गायींसह एका वासराचा मृत्यू झाला आहे. ही प्रकार सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या उघडकीला आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पंजाब राज्यातून गायींची अत्यंत निर्दयतेने व क्रुरतेने दोन ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची माहिती यावल तालुक्यातील गो प्रेमींना मिळाल्यानंतर त्यांनी ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकांनी त्यांना हुलकावणी देत ट्रक सुसाट वेगाने भुसावळच्या दिशेने निघाला होता. ही बाबत भुसावळातील गो प्रेमींना कळवण्यात आल्यानंतर गो प्रेमींनी भुसावळ शहरातील यावल नाक्यावर सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता दोन ट्रक गो प्रेमींच्या उपस्थितीत अडवण्यात आल्या. भुसावळ शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी दोन ट्रकची पाहणी केली असता अत्यंत दाटीवाटीने व निर्दयतेने गायींची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. ट्रकमध्ये गुरांसाठी कुठलीही चारा-पाण्याची व्यवस्था नसल्याने दोन्ही ट्रक अकलूद येथील आसाराम बापूजी आश्रमात नेण्यात आल्या. यावेळी गुरांची चारा-पाण्याची तसेच उपचाराची व्यवस्था करण्यात आली.

संशयीतांनी गायी पालनासाठी नेत असल्याचा दावा केला, मात्र प्रत्यक्ष पाहणीत गुरांची चारा-पाण्याची व्यवस्था दिसून आली नाही तसेच अत्यंत दाटी-वाटीने व क्रुरतेने त्यांची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. क्रुरतेने गुरांची वाहतूक केल्यानंतर दोन गायींसह एका वासराचा गुदमरल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

Protected Content