हल्ला प्रकरणातील तिघांना न्यायालयीन कोठडी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील समता नगरातील आलोटकर कुटुंबाला डांबून ठेवत हल्ला केल्या प्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, शहरातल्या समता नगरातील आशिष आलोटकर या तरुणाला डांबून ठेवून मारहाण करणे तसेच कुटुंबाला ओलिस ठेवण्यात आले होते. या संपूर्ण कुटुंबाला धमकावण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी खरात टोळीतील चौघांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी या प्रकरणी पप्या साळवे, आकाश खिल्लारे, सुमित घनघाव यांना अटक केल्यानंतर त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी संशयीतांना न्यायालयात हजर केले असता तीनही संशयीताना ७ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख संशयित आतीष खरात हा अद्यापही फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Protected Content