भजे गल्लीतून एकाच्या खिश्यातून मोबाईल लांबविला; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील भजे गल्लीत पायी जाणाऱ्या हात मजूराच्या खिश्यात १२ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात दोन भामट्यांनी जबरी खिश्यातून काढून पळ काढल्याची घटना मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, अविनाश रामदास खैरनार (वय-५०) रा. प्रतापनगर जिल्हापेठ हे हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात. १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील नविन बसस्थानकाजवळील भजे गल्लीतून पायी जात असतांना त्याच्या मागून येवून आज्ञात दोन जणांनी त्यांच्या खिश्यातील १२ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी काढून चोरून पळ काढल्याची घटना घडली. त्यांनी आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोन्ही भामटे पसार झाले होते. याप्रकरणी अविनाश खैरनार यांनी १४ ऑक्टोबर रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शरीफ शेख करीत आहे.

Protected Content