बेस्टच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा

bassss

मुंबई प्रतिनिधी । तिकीट दरात मोठी कपात करुन प्रवाशांना दिलासा देणाऱ्या बेस्टनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सर्वसामान्यांचा प्रवास स्वस्त करणाऱ्या बेस्टनं आता बेस्टची वीज वापरणाऱ्यांसाठी अभय योजना आणली आहे. अभय योजनेच्या अंतर्गत थकीत वीज बिलावरील १०० टक्के व्याज आणि विलंबित आकार रद्द केला जाणार आहे. १ ऑक्टोबर २००६ ते ३१ डिसेंबर २०१५ या दरम्यान वीज देयकाची थकबाकी न भरल्यानं वीज मापक (मीटर) काढण्यात आलेल्या सर्व ग्राहकांना अभय योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेला ‘अभय योजना २०१९’ असं नाव देण्यात आलं आहे. पूर्वीच्या अभय योजनेच्या समाप्तीनंतर म्हणजेच ३१ मार्च २०१९ ते ९ जुलै २०१९ या कालावधीत प्राप्त झालेले अर्जदेखील या योजनेसाठी पात्र असणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रभागाच्या विभागीय अभियंता ग्राहक सेवेशी संपर्क साधण्याचं आवाहन बेस्टकडून करण्यात आलं आहे.

Protected Content