जुन्या वादातून तरूणावर प्राणघातक हल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील अरिहंत जैन बेकरीजवळ जुन्या वादातून कुसुंबा येथील एका तरूणाला चॉपर, लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली.. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र बाबुराव पवार वय ३६ हा तरूण जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे वास्तव्याला आहे. त्याचा चुलत भाऊ राजेश जगराम पवार याने गावातील काही जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून रविवारी ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाता रविंद्र पवार हा एमआयडीसीतील अरिहंत जैन बेकरीजवळून जात असतांना योगेश पाटील, सागर कोळी, अक्षय कोळी, अजय परधी आणि बंटी गुजर सर्व रा. कुसुंबा ता.जि.जळगाव यांनी रस्ता आडविला. पाचही जणांनी चॉपर, लोखंडी रॉड आणि दगडांनी रविंद्र पवार याला शिवीगाळ करून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली.

हा प्रकार घडल्यानंतर जखमी तरूणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार योगेश पाटील, सागर कोळी, अक्षय कोळी, अजय परधी आणि बंटी गुजर सर्व रा. कुसुंबा ता.जि.जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार हे करीत आहे.

Protected Content