Home Cities जळगाव हतनुर-गिरणा धरणांसह राज्यातील सहा धरणांमधील गाळ काढण्याच्या धोरणास मंजुरी !

हतनुर-गिरणा धरणांसह राज्यातील सहा धरणांमधील गाळ काढण्याच्या धोरणास मंजुरी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील धरणांमध्ये वर्षानुवर्षे साचलेल्या गाळामुळे कमी झालेली जलसाठा क्षमता पुन्हा वाढविण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. जलसंपदा विभागाच्या सुधारीत गाळ निष्कासन धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, उत्तर महाराष्ट्रातील हतनुर आणि गिरणा धरणांसह राज्यातील सहा मोठ्या प्रकल्पांमध्ये प्रायोगिक तत्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू उपसा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सिंचन क्षमता वाढण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 


Protected Content

Play sound