जळगाव प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी युवा संवाद कार्यक्रमात तरूणाईशी केलेल्या वार्तालापात परिवर्तनाचा नारा बुलंद करून अभिषेकदादांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
अभिषेक पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावसाठी तरूण चेहरा दिला असून त्यांच्या प्रचारात शहरातील तरूणाई मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्रचाराच्या निर्णायक टप्प्यात तरूणांशी विविध विषयांवर संवाद साधण्यासाठी आज राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नामदेवराव चौधरी, मंगलाताई पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यात अभिषेक पाटील, अरूंधती अभिषेक पाटील आणि आशीष पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अभिषेकदादांनी तरूणांशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. यात प्रामुख्याने जळगाव शहरात कोणतीही विकासकामे झाली नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याची मते अनेकांनी व्यक्त केली. तसेच शहरात कोणताही मोठा प्रकल्प नसल्यामुळे बेरोजगारीदेखील मोठ्या प्रमाणात वाढल्याची तक्रार अनेकांनी केली. यावर अभिषेक पाटील यांनी सत्ताधार्यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, विद्यमान आमदारांनी रोजगार निर्मितीसाठी कोणतेही प्रयत्न केले नसून आपण निवडून आल्यानंतर यासाठी मोठे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
दरम्यान, याप्रसंगी उपस्थित असणार्या तरूण-तरूणींनी या निवडणुकीत अभिषेक पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.