टपरीवर दगड मारल्याच्या संशयावरुन राजमालती नगरात तरूणावर जीवघेणा हल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । टपरीवर दगड मारल्याच्या संशयावरुन तीन जणांनी कपडयाच्या दुकानातील कैचीने शेख मुज्जमिल शेख निसार (वय २०, रा. राजमालतीनगर) या तरुणाच्या बरगड्यांजवळ वार करुन गंभीर दुखापत केली. ही घटना राजमालती नगरात घडली. याप्रकरणी बुधवारी १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील राजमालती नगरातील शेख मुज्जमिल शेख निसार या तरुणाचे डायमंड चौकात असलेल्या टेलरचे दुकान मालक इसाक मणियार व त्यांचे दोन्ही मुले वसीम व आसिफ यांच्यासोबत पाच ते सहा महिन्यांपुर्वी वाद झाला होता मंगळवारी ९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शेख मुज्जमिल हा मित्रांसोबत चौकात उभा असतांना वसीम मणियार हा दुकानातून त्याला शिवीगाळ करीत होता. शेख मुज्जमिल याने त्याला जाब विचारला असता, त्याने तु माझ्या टपरीवर दगड का मारला असे विचारले, त्यावर तरुणाने मी दगड मारला नसून आम्ही फक्त उभे आहोत असे सांगितले. त्यावर वसीम याने त्याच्या दुकानातील कपडे कापण्याची कैचीने मुज्जमील याच्या बरगड्यांवर वार केले. तरुणाने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याला पुन्हा दुसऱ्या हातावर वार करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली.

तरुणाच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याला लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी उपचार घेतल्यानंतर शेख मुज्जमिल हा शहर पोलिसात तक्रार देण्यासाठी आला. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन इसाक मणियार (वय ५८), वसीम मणियार (वय ३५) व आसिफ मणियार (वय ३३, सर्व रा. राजमालती नगर) यांच्याविरुद्धशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content