भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावहून जामनेरला जात असलेल्या दुचाकीला भरधाव कार जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी दोन्ही गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी चिंचोली गावाजवळ घडली. जखमी दाम्पत्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, ‘भास्कर शालीग्राम वाणी (वय-४५) आणि त्याची पत्नी मनिषा भास्कर वाणी (वय-३८) हे जळगावाला वास्तव्याला आहे. कडधान्य विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. रविवारी १० एप्रिल रोजी जामनेरला कामासाठी दुपारी ३ वाजता भास्कर वाणी व त्यांची पत्नी हे दोघे दुचाकीने निघाले होते. जळगाव-जामनेर रस्त्यावरील चिंचोली गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावरून दोघे जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात भास्कर वाणी व त्यांची पत्नी मनिषा वाणी हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना चिंचोली गावातील काही तरूणांनी खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. याबाबत पोलीसांत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

Protected Content