Home राजकीय नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागतच : अमोल कोल्हे

नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागतच : अमोल कोल्हे


Dr Amol Kolhe
 

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे नविन समीकरण जुळू पाहत आहे. या नव्या समीकरणावर महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागत करेल,” असे मत राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे.

 

स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा भाजपाकडून केला जात असताना त्यांचा विजयी रथ १०७ जागांवरच थांबला. त्यामुळे भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याची चर्चा सुरू झाली. भाजपा शिवसेना सत्तेत बसणार असं चित्र तयार होत असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीनं भाजपाला सत्तेपासून रोखणं आपला प्राधान्यक्रम असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण केला. त्याचबरोबर नव्या आघाडीची मोट बांधण्याचे संकेतही दिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवं असल्यास त्यांनी राष्ट्रवादीसोबत यावे, असं सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


Previous articleराधाकिसन जोशी यांचे निधन
Next articleमुंबईत पराभूत मनसे उमेदवारांची बैठक
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound