मुंबईत पराभूत मनसे उमेदवारांची बैठक

Raj 2

 

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची आज (दि.25) कृष्णकुंजवर बैठक बोलवली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेने एकूण 105 ठिकाणी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र यामधील फक्त एकाच उमेदवाराचा विजय झाला आहे. तर बाकी सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. 2014 च्या निवडणुकीतही मनसेनेला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता. यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची कृष्णकुंजवर बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज ठाकरे निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत. सकाळी 11 च्या दरम्यान सर्व उमेदवार कृष्ककुंजवर उपस्थित राहण्यास सांगितले आहे. कल्याण येथून मनसेचे राजू पाटील यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा 7 हजारच्या फरकांनी पराभव केला. या मतदारसंघात शिवसेना आणि मनसे अशा दोघांमध्ये चुरशीची लढत होती.

Protected Content