मनमाड येथे मविआचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ रोहिणी खडसे यांची सभा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सरकारी योजना जनतेच्या पैशातून राबविल्या जातात आणि आता सरकारी योजनांच्या प्रत्येक जाहिरात मध्ये भारत सरकार ऐवजी मोदी सरकार म्हटले जाते म्हणून आता सर्वांना मोदी सरकार नको तर आम्हाला आमचे हक्काचे भारत सरकार पाहिजे तेच भारत सरकार ज्या भारत सरकारच्या काळात माझ्या शेतकरी बांधवांच्या कांद्याला योग्य भाव मिळेल, माझ्या तरुणांना रोजगार मिळेल माझ्या माता भगिनी सुरक्षित राहतील ते भारत सरकार आम्हाला पाहिजे या मातीमध्ये आज जो शेतकरी बांधवांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. त्या माझ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मागण्या सरकारकडे मागण्याचा अधिकार आम्हाला हवाय असे आम्हाला आमच्या हक्काचे भारत सरकार हवे आहे आता मोदी सरकार नको आहे. म्हणून योग्य व्यक्तीला मतदान करून प्रत्येक ठिकाणी भारत सरकार म्हटले जाईल असे शेतकरी, कष्टकरी महिला, तरुणांना न्याय देणारे भारत सरकार आणाअसे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मनमाड येथील प्रचार सभेत केले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी-इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार भास्कर मुरलीधर भगरे गुरुजी यांच्या प्रचारार्थ मनमाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची प्रचार सभा पार पडली. या सभेस संबोधित करताना रोहिणी खडसे म्हणाल्या आजच्या सभेत उपस्थित प्रत्येकाचा उत्साह आहे हा उत्साह आम्हा सर्वांना विश्वास देतो तुम्ही भगरे सरांना मतदान करून निवडून आणाल याचीच नांदी आजच्या उत्साहातून बघायला मिळते आहे,येत्या विस तारखेला फक्त स्वतः साठी मतदान करायचे नसुन विस तारखेला मतदानातून सर्वांनी सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाचा सरकारने केलेल्या कामांचा आणि विद्यमान खासदारांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा जाब विचारायचा आहे. इथल्या लोकप्रतिनिधी खासदार झाल्या मंत्री झाल्या आरोग्य मंत्री पद मिळाले पण मंत्रीपदाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात मतदारसंघाला काय दिले? मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आले का किंवा मोठे आरोग्य केंद्र आले का?किंवा आरोग्याच्या इतर सोयी मिळाल्या का? कोरोना काळात केंद्रीय आरोग्य मंत्री पद भूषवले. राजेश टोपे यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या उत्कृष्ठ कार्याची जगभरात दखल घेतली गेली.
दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे कार्य आपण बघितले कोरोना काळात उत्तरप्रदेशात नदीतून मृतदेह वाहतानाचे व्हिडीओ आपण बघितले अशी त्यावेळी परिस्थिती होती याचा जाब विस तारखेला विचारायचा आहे. विस तारखेला मतदानाला जाल तेव्हा या प्रत्येक गोष्टीचा जाब विचारून विचारपूर्वक मतदान करायचे आहे. आज आपण सरकारी योजनांच्या जाहिराती बघतो सरकारी योजना जनतेच्या कराच्या पैशातून राबविल्या जातात पण आता या योजनांच्या प्रत्येक जाहिराती मध्ये आपल्याला भारत सरकार ऐवजी मोदी सरकार म्हटलेले दिसते दहा वर्षाच्या काळात भारत सरकारचे मोदी सरकार केले गेले सत्ताधाऱ्यांना भारत सरकार म्हणायची लाज वाटते. भारत सरकार बदलवून हे मोदी सरकार म्हणत आहेत ज्या भारत देशाचे नाव घेतले तरी अंगावर शहारे येतात त्या भारत देशाचे सरकार आणायची जबाबदारी हि तुमची आमची आहे याच्यापुढे नो मोदी सरकार आम्हाला आमचे हक्काचे भारत सरकार पाहिजे. तेच भारत सरकार ज्या भारत सरकारच्या काळात माझ्या शेतकरी बांधवांच्या कांद्याला योग्य भाव मिळेल. माझ्या तरुणांना रोजगार मिळेल माझ्या माता भगिनी सुरक्षित राहतील ते भारत सरकार आम्हाला पाहिजे.
या मातीमध्ये आज जो शेतकरी बांधवांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे त्या माझ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मागण्या सरकारकडे मागण्याचा अधिकार आम्हाला हवाय असे आम्हाला आमच्या हक्काचे भारत सरकार हवे आहे आता मोदी सरकार नको आहे. म्हणून विचारपूर्वक योग्य व्यक्तीला मतदान करून करून प्रत्येक ठिकाणी भारत सरकार म्हटले जाईल असे शेतकरी, कष्टकरी महिला ,तरुणांना न्याय देणारे भारत सरकार आणा. एखाद्याला किती त्रास दयायचा गेल्या दहा वर्षात सर्व तुम्ही बघितलं असेल अख्खे पक्ष फोडले तोडाफोडी केली अख्ख्या राजकारणाचा बट्ट्याबोळ केला आता भविष्यात जर हेच सरकार दिले तर मला वाटते आपल्या न्याय हक्कावर नक्कीच गदा येईल. आता आपण जे अभिमानाने मेरा भारत महान म्हणतो उद्या हेही म्हणायचा अधिकार राहतो कि नाही सांगता येत नाही. काल मोदी साहेबांच्या सभेमध्ये एक तरुण शेतकरी बांधव मोदी साहेबांना कांद्यावर बोला असे म्हणाला त्या तरुणाला पोलिसांनी फरफटत नेले आणि डांबून ठेवले आज प्रत्येक शेतकरी बांधवांच्या हक्काचा प्रश्न आहे आज प्रत्येकाच्या शेतमालाला भाव मिळाला पाहीजे याची मायबाप सरकारकडे मागणी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि आज तो अधिकार तुमच्याकडून हिरावण्यात येतो आहे गेले दहा वर्षे झाले हे जे दडपशाहीचे सरकार आहे हे दडपशाहीचे सरकार तुम्हाला मतदानातून घालवायचे आहे. मला माहिती आहे तुम्ही सर्व सुज्ञ नागरिक आहात येत्या विस तारखेला तुम्ही सदविवेक बुद्धीने विचारपूर्वक मतदान कराल. कारण गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला जो जो त्रास झालेला आहे तुमच्यावर कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ आलेली आहे या सर्व गोष्टीची आठवण करून मतदानाला जा आणि विचारपूर्वक योग्य व्यक्तीला मतदान करा ते व्यक्ती म्हणजे भगरे सर होय ज्यांना सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे दिंडोरी मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी विस तारखेला मतदानाला बाहेर पडून भास्कर भगरे सरांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना केले
यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे ,हेमंत टकले , मारोतराव पवार, आ. नरेंद्र दराडे, माजी आमदार अनिल कदम, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, नितेश कराळे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राजा भाऊ राजपुरकर, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, शिवसेना(उबाठा) जिल्हाप्रमुख मोहन धात्रक, तिलोत्तमा ताई पाटिल, संगीता पाटिल, पंडितराव कांबळे, कुणाल दराडे आणि महाविकास-इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content