ऑस्ट्रेलियासमोर २५६ धावांचे लक्ष्य

 

मुंबई प्रतिनिधी । भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने २५५ धावांपर्यंत मजल मारली आहे. मालिकेत आघाडी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोह २५६ धावांचे लक्ष्य आहे.

नवीन वर्षात पहिला वन-डे सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने २५५ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय धावगतीवर अंकुश लावला. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने ७४ तर लोकेश राहुलने ४७ धावांची खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.

Protected Content